पुणे : पुण्यात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांच्या मेळ्यात गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलमधील अडीचशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली;तसेच सामाजिक बांधिलकी, पर्यावरण रक्षण, वृक्ष संवर्धन, प्लास्टिक बंदी याबद्दल जनजागृती केली. गोयल गंगा फाउंडेशनतर्फे वारकऱ्यांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.
गेल्या चार वर्षांपासून वारीच्या काळात गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलचे नववी ते बारावीचे विद्यार्थी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागासोबत काम करतात. या वेळी शाळेच्या विश्वस्त सोनू गुप्ता, मुख्याध्यापिका भारती भागवाणी, तसेच इतर शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. वारीच्या आठवणी कायमस्वरूपी जतन केल्या जाव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंटरी करण्याचे ठरवले असून, त्यासाठी त्यांनी महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. चित्रीकरण केले आणि छायाचित्रेही घेतली.
या वेळी सोनू गुप्ता म्हणाल्या, ‘वारीची परंपरा फक्त एकमेकांना जोडत नाही, तर ती आपल्या मुळांना एकत्र ठेवते. वारीमधून माणुसकीचे आणि एकात्मतेचे दर्शन घडत असते. हा अनुभव नव्या पिढीने घ्यावा, या हाच या उपक्रमागचा हेतू आहे.